गडचिरोली | --°C | --°C |
देसाईगंज, ता.१: शेतात ठेवलेली तणीस काढत असताना विषारी सापाने दंश केल्याने शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास शिवराजपूर येथे घडली. विश्वनाथ पांडु दुफारे(६५)असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
विश्वनाथ दुफारे हे आज सकाळी तणीस आणण्यासाठी शेतावर गेले होते. परंतु बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतावर जाऊन बघितले असता श्री.दुफारे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस निघत होता. लगेच त्यांना देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून असा परिवार आहे.