गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२३: नक्षल्यांनी आज रस्त्यावर झाडे आडवी टाकून भामरागड-कोठी मार्ग अडविल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
भामरागड-कोठी मार्गावरील हलवेर व कियर गावांदरम्यान नक्षल्यांनी झाडे आडवी टाकून ठेवली होती. त्यामुळे काल अहेरी येथून कोठी येथे गेलेली बस आज सकाळी परतीच्या प्रवासात पुन्हा माघारी फिरली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. घटनास्थळी नक्षल्यांनी काही पत्रकेही टाकली आहेत. २२ एप्रिल रोजी कसनासूर जंगलात ठार झालेल्या ४० नक्षल्यांमध्ये काही निरपराध नागरिक असल्याचा दावा नक्षल्यांनी या पत्रकांमध्ये केला असून, त्या घटनेचा निषेध केला आहे.