गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१२: येथील पोलिसांनी नागरिकांना नुकतेच ओल्या व सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनविण्याचे प्रशिक्षण दिले. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
राज्य राखीव दलाचे पोलिस निरीक्षक टी.सी.उपाध्याय यांनी नागरिकांना हे प्रशिक्षण दिले. राज्य राखीव दलाच्या बल क्रमांक ८ चे सहायक समादेशक जी.टी.मोरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी पोलिस मुख्यालयातील खानावळीची स्वच्छता राखणारे कर्मचारी, पतंजली किसान सेवा समितीचे संजय देशमुख, वर्षा देशमुख उपस्थित होते. यापुढे जमा होणारा कचरा इतरत्र न फेकता त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करुन पोलिस मुख्यालय स्वच्छ ठेवू, असा निर्धार प्रशिक्षणकर्त्यांनी घेतला.
प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी पोलिस कल्याण शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, राखीव पोलिस निरीक्षक ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.