गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.७: नोव्हेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे हजारो एकर शेतीतील पिकाचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज लोकसभेत केली.
शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित करताना खा.अशोक नेते म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील धान, सोयाबीन व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले. कापणीसाठी तयार झालेले धान सडले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना एकरी १० हजार व हेक्टरी २५ हजार रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी खा.नेते यांनी केली.