गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता. २६ : सतत चार-पाच दिवस पाऊस पडल्यानंतर आता पावसाने डोळे वटारल्याने रोवणीची कामे खोळंबली असून, खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अहेरी परिसराकडे पावसाने पाठ फिरविल्याने तेथील शेतक-यांपुढे मोठे संकट उभेठाकले आहे़.
गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, लगेच उन्ह तापू लागल्याने शेतातील पाणी आटले आहे़.परिणामी रोवणीची कामे अर्धवट राहिली आहेत.कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यत केवळ ८ टक्केच रोवणी झाली आहे.
गडचिरोली उपविभाग अंतर्गत गडचिरोली, चामोर्शी व धानोरा व मुलचेरा तालुक्यात १६ हजार १९३ हेक्टर क्षेत्रात पेरणी (प-हे) करण्यात आली आहे. वडसा उपविभागात कुरखेडा, कोरची, आरमोरी व देसाईगंज तालुक्यात १५ हजार १३१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा या तालुक्यात मात्र केवळ १० हजार ३११ हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.