गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१७: गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसह आदिवासी समाजाच्या उत्थानात दिवंगत बाबूराव मडावी यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी केले.
आदिवासी समाजातर्फे माजी मंत्री दिवंगत बाबूराव मडावी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फरेंद्र कुतीरकर म्हणाले की, बाबूराव मडावी मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळेच स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यामुळे तेच या जिल्ह्याच्या निर्मितीचे शिल्पकार आहेत. शिवाय बाबूराव मडावी यांनी केलेल्या कार्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. बाबूराव मडावी यांचे योगदान लक्षात घेता गडचिरोली शहरात त्यांचा पुतळा उभारावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती रंजिता कोडापे, नगरसेवक गुलाब मडावी, नगरसेविका रंजना गेडाम, आदिवासी सेवक घनश्याम मडावी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष भरत येरमे, कवयित्री कुसुम आलाम, कैलास मडावी, सदानंद ताराम, आनंद कंगाले, प्रदीप कुलसंगे, वर्षा शेडमाके, उत्तम गेडाम, राजीवशहा मसराम, रोहिणी मसराम, सुखदेव वेठे, ऋषी होळी, ऋषी कुळमेथे, मुकुंदा सिडाम, वनिशाम येरमे, दिलीप शेडमाके, डंबाजी पेंदाम, श्रीनिवास कोडाप, नीतेश मडावी, सुधीर मसराम, देवराव आलाम, विनायक कोडापे, राजेश्वर पदा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अमरसिंह गेडाम व देवराव आलाम, तर आभार प्रदर्शन विनायक कोडाप यांनी केले.