गडचिरोली | --°C | --°C |
मुंबई,ता.१५: राज्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी पाचवी ते आठव्या वर्गापर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरु होण्यास असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. मात्र, शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.