गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२६: केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या काही निर्णयांमुळे भारतीय राज्यघटनेला धक्का बसेल, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. देशाची धर्मनिरपेक्षताही धोक्यात आली आहे. आजची ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनी गडचिरोलीत संविधान व लोकशाही बचाव रॅली काढण्यात आली.
यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, समशेरखान पठाण, शहराध्यक्ष सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, पुरुषोत्तम मसराम, नंदू वाईलकर, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, बाबूराव बावणे, महादेव भोयर, तुळशीदास भोयर, रजनिकांत मोटघरे, तौफिक शेख, नीतेश राठोड, प्रतीक बारसिंगे, राकेश रत्नावार, जितेंद्र मुनघाटे, सुभाष धाईत, भास्कर नरुले, राजू आखाडे, निलीमा राऊत, अपर्णा खेवले, रोहिणी मसराम, बबिता उसेंडी, दर्शना लोणारे, कल्पना नंदेश्वर, दर्शना मेश्राम, सत्यविजय देवतळे, पुष्पराज लाडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.