गडचिरोली | --°C | --°C |
देसाईगंज, ता.१९: आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. विकास चंदन चौधरी (१८) रा. तुकुमवॉर्ड, देसाईगंज व नीलेश प्रफुल्ल बिजलेकर (१८) रा. कन्नमवार वॉर्ड, देसाईगंज अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असून, ते देसाईगंज येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकत होते.
विकास चौधरी व नीलेश बिजलेकर हे दोघेही आज सकाळी शिकवणी वर्गाला जायचे आहे म्हणून घराबाहेर पडले. त्यानंतर दुपारी ते वैनगंगा नदीच्या विर्शी घाटावर गेले. तेथे आंघोळ करीत असताना डोहात बुडून दोघांचाही अंत झाला. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. पोलिस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांच्या मार्गदर्श॔नात पोलिस उपनिरीक्षक सारिका गुरुकर तपास करीत आहेत.