गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.५: राज्य विधीमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवसांचे केल्याचा विरोध म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘लोकशाही वाचवा दिन’ पाळून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केवळ दोन दिवसांचे विधीमंडळाचे अधिवेशन आयोजित करणे म्हणजे अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याच्या लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन आहे, असे निवेदन भाजप नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना पाठविले.
या आंदोलनात नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, गोविंद सारडा, आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम,जिल्हा सरचिटणीस सदानंद कुथे,जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. भारत खटी, बंगाली आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शहा, रमेश भुरसे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष् मुक्तेश्वर काटवे, स्वप्नील वरघंटे, आनंद जी गण्यारपवार, दिलीप चलाख सागर कुमरे, विलास भांडेकर, साईनाथ बुरांडे, अनिल पोहनकर, विनोद देवोजवार, नगर परिषद सभापती नीता उंदिरवाडे सहभागी झाले होते.